महाराष्ट्रातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा; पेंशन आता १५०० ऐवजी २५०० रुपये

Facebook
Twitter
WhatsApp
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने दिव्यांग नागरिकांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला असून आता संजय गांधी निराधार अनंत योजना आणि श्रवण बाल योजना अंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांच्या ऐवजी थेट २५०० रुपयांची पेंशन मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पाच लाखांहून अधिक दिव्यांग लाभार्थ्यांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
या योजनेसाठी ५७० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला असून, ऑक्टोबर २०२५ पासून वाढीव रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. संजय गांधी निराधार अनंत योजना अंतर्गत सुमारे ४.५ लाख लाभार्थी तर श्रवण बाल योजना अंतर्गत जवळपास २४ हजार मुले या वाढीचा लाभ घेणार आहेत.
सामाजिक न्याय व कौशल्य विकास विभागाने ही तरतूद केली असून, दिव्यांगांच्या सामाजिक आणि आर्थिक समावेशासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दैनंदिन खर्च भागवण्यासाठी तसेच शिक्षण, आरोग्य व जीवनमान सुधारण्यासाठी या वाढीचा थेट फायदा होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
तज्ज्ञांच्या मते, “राज्य सरकारने आव्हानात्मक आर्थिक परिस्थितीतही दिव्यांगांच्या हक्कांचा विचार करून घेतलेला हा निर्णय त्यांचा सामाजिक आत्मसन्मान वाढवणारा आहे. ही वाढ केवळ आर्थिक मदत नसून सामाजिक न्यायाच्या दिशेने उचललेले मोठे पाऊल आहे.”
या निर्णयामुळे दिव्यांग व्यक्तींना अधिक स्थैर्य मिळून त्यांचा समाजातील सहभाग वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जातआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags